शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतने कॅनाडाच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा; फक्त 'या' लोकांना मिळणार परवानगी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 22:02 IST

India-Canada Issue: खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले आहेत.

India-Canada Row: भारत आणि कॅनडामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडलेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली व्हिसा सेवा बुधवारी (25 ऑक्टोबर) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाच्या ओटावामधील भारतीय उच्चायुक्तांनी (High Commission of India) सोशल मीडियावर सांगितले की, व्हिसा सेवा केवळ प्रवेश व्हिसा, व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा या श्रेणींमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. उच्चायुक्तांनी निवेदनात पुढे म्हटले की, सुरक्षा कारणास्तव यापूर्वी व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा व्हिसा सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून (26 ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

कॅनडाने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावलेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच सांगितले होते की, भारतात कॅनडाच्या डिप्लोमॅट्सची संख्या जास्त आहे, त्यामुळे समतोल निर्माण करण्याची गरज आहे. हे लोक भारताच्या अंतर्गत बाबींमध्येही ढवळाढवळ करतात. त्यामुळे कॅनडाने आपले अधिकारी परत बोलवावे, आम्ही लवकरच त्यांना दिलेली सूट मागे घेणार आहोत. यानंतर कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलावावे लागले. 

वाद कसा सुरू झाला?कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरची जुन महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येचा आरोप भारतावर लावला. भारतीय गुप्तचर संस्थांनी हत्या केल्याचे वक्तव्य ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केले. याला उत्तर देताना भारताने ट्रूडोचे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतरच हा वाद सुरू झाला.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाVisaव्हिसाInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर