शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 14:07 IST

येथील अनंतनागजवळ NH-44वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू आहे. कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर येथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभारताने लडाखजवळील 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) चीननेही विविध प्रकारची कामे केली आहेत.भारतही जवळपास 60 बोफोर्स आर्टिलरी तोफा लडाखजवळ फॉरवर्ड पोझिशनवर पाठवत आहे.

नवी दिल्ली :भारत आणि चीन सध्या लडाखमध्ये आमनेसामने आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत तणावाचे वातावरण आहे. संबंधित वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारत थोडीही उनीव ठेऊ इच्छित नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने लडाखजवळील 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमानं ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. एवढेच नाही, तर भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही आता चीनच्या दिशेनं वळवली आहेत.

येथील अनंतनागजवळ NH-44वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू आहे. कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर येथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.

'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) चीननेही विविध प्रकारची कामे केली आहेत. तसेच विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचीही जमवाजमव सुरू आहे. तर दुसरीकडे भारतही जवळपास 60 बोफोर्स आर्टिलरी तोफा लडाखजवळ फॉरवर्ड पोझिशनवर पाठवत आहे. चीनसोबत सुरू असलेला वाद संपवण्याची आपली इच्छा आहे. मात्र, आपण कुठल्याही स्थितीचा सामना करायलाही तयार आहोत, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. 

दक्षिण कश्मीरमधील बिज्बेहरा भागात NH-44वर हवाई दल धावपट्टी तयार करत आहे. तिची लांबी 3 किमी. एवढी आहे. चीनसोबत सुरू असलेल्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचे काम सुरू झाले आहे. सध्या लॉकडाउन सुरू आहे. मात्र, असे असले तरी या कामासंदर्भातील सर्व प्रकारची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये तैनात आहे. येथे सर्वप्रथम दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता. यानंतर चीनने तेथील सैन्य संख्या वाढवली आणि निर्माण कार्याला गती दिली. मात्र, यानंतर दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. नुकतीच पहिल्या स्थरावरील बोलनेही पूर्ण झाले आहे. आता वृत्त आले आहे, की चीनी सैनिक सीमेवर दोन किलो मीटर मागे हटले आहेत.

लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील. 

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाख