शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:22 IST

India-China Clash: काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांचे खासदार लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर चर्चेची मागणी करत होते.

Lok Sabha Session: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग येथे भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून बुधवारी (14 डिसेंबर) लोकसभेत गदारोळ झाला. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार आणि तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत. 1962 मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू झाले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 165 खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले.

सभापती काय म्हणाले...काँग्रेस नेत्याच्या मागणीला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ वॉकआऊट केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला. 

याआधीही खासदारांनी सभात्याग केला होताआदल्या दिवशी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्यांच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते. यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षांच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहातून सभात्याग केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाindia china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश