शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

India China Conflict: भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:36 IST

India China Conflict: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे

नवी दिल्ली - आधीच तणावपूर्ण असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहे. ९ डिसेंबर रोजी ही हिंसक झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असतानाच या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. तसेच भारतीय जवानांनी इंगा दाखवल्यानंतर घुसखोर चिनी सैनिकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. 

भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करण्याचा चीनचा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेवरून चिंता व्यक्त होत असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओला अद्याप लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडीओ जुना असल्याचाही दावा केला जात आहे.  मात्र हा व्हिडीओ धडाक्याने व्हायरल होत आहे. भारताच्या जवानांनी घेतलेल्या रुद्रावतारामुळे घुसखोर चिनी सैनिक बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. तर भारताचे जवान त्यांना बडवून काढताना दिसत आहेत.

दरम्यान, ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणाले की, चिनी सैन्याने ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडले. या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल