शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'जवानांनी अप्रतिम शौर्य दाखवले; भारताची 1 इंचही जमीन गेली नाही', गृहमंत्री अमित शहांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:29 IST

अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली, यावर अमित शहांनी मोठी माहिती दिली.

India-China Conflict : अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाल्याची माहिती आहे. या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर आता गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी माहिती दिली. 

काय म्हणाले अमित शहा?'आज देशात भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत आपले सरकार आहे, तोपर्यंत भारताच्या 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही. 8 तारखेच्या रात्री आणि 9 तारखेला सकाळी आपल्या सैन्याच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मला कौतुक वाटते. सैन्याने काही वेळातच घुसलेल्या सर्व लोकांचा पाठलाग केला आणि आपल्या भारत भूमीचे रक्षण केले,' अशी माहिती शहा यांनी दिली.

लोकसभेत गदारोळ...आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू न दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. या कृत्याचा मी निषेध करतो, असे शह म्हणाले. संसदीय कामकाज मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तवांगच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन देणार आहेत. यावेळी मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची खरी चिंता समजली. त्यातील एक प्रश्न राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ)चा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (एफसीआरए) परवाना रद्द करण्याबाबत होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील घटनांचा संदर्भ देत मौल्यवान प्रश्नोत्तराचा तास वाया घातला. 12 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात या विषयावर आपले म्हणणे मांडणार होते, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलण्यात काही अर्थ नव्हता. राजीव गांधी फाऊंडेशनला संशोधनाच्या नावाखाली चिनी दूतावासाकडून 1.35 कोटी रुपये मिळाले. मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता, हा तुमच्या संशोधनाचा विषय होता का? अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहindia china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश