शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

India China Face Off: जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 09:54 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; एस-४०० लवकर सोपवण्याची मागणी करणार

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावरभारत रशियाकडे एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणारचीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं शस्त्रास्त्र सज्जता वाढवण्यावर भारताचा भर

नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत-चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. यासोबतच आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. जुना मित्र असलेल्या रशियासोबत भारतानं क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा एस-४०० साठी करार केला होता. ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारतानं प्रयत्न केले आहेत.२०१८ मध्ये भारतानं एस-४०० साठी रशियासोबत ५ अब्ज डॉलरचा करार केला. कोरोनाचं संकट आल्यानं एस-४०० यंत्रणा मिळण्यास विलंब होत आहे. ही यंत्रणा डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. सैन्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसोबत उडालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाचं संकट असल्यानं सध्याच्या घडीला मंत्री परदेश दौरे टाळत आहेत. मात्र तरीही सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सिंह चीनसाठी रवाना होत आहेत. सिंह यांचा रशिया दौरा तीन दिवसांचा असेल. एस-४०० क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर देण्यात यावी, असा आग्रह सिंह यांच्याकडून रशियाकडे करण्यात येणार आहे. भारतानं गेल्याच वर्षी एस-४०० साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-४०० यंत्रणा आहे.चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं अधिकाधिक शस्त्रास्त्र सज्ज होण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ देऊन एस-४०० यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया