शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 10:42 IST

चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी  विरोधी पक्षांनी लावून धरली होती.

नवी दिल्ली : भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

 चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी  विरोधी पक्षांनी लावून धरली होती. यानुसार शुक्रवारी मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यामध्ये देशाची एक इंचही जागा कोणाच्या ताब्यात गेलेली नाही, एकही पोस्ट चीनच्या ताब्यात गेलेली नाही, असे स्पष्ट केले होते. यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमकतेपुढे झुकत स्वत:ला सरेंडर केले आहे. पंतप्रधानांचे म्हणणे असे असेल तर सोमवारी भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसलेले असा अर्थ निघतो. ज्या जागेवर भारतीय जवान शहीद झालेत, ती जागा चीनची होती का? आपल्या सैनिकांना का मारण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

विरोधी पक्षांसोबतच्या बैठकीमध्ये मोदी यांनी परिस्थिती स्पष्ट केली. पूर्व लडाखमधील गलवान खोºयामध्ये चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजिलेल्या व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेपलीकडून येणाºया आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर राजनैतिक पातळीवरून भारताने आपली ठाम भूमिका चीनच्या कानावर घातली आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सर्व भारतीय कटिबद्ध आहेत हेच सर्वपक्षीय बैठकीतील चर्चेतून दिसून आले. भारताची कुरापत काढण्याचा कोणी विचारही करू नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, ही बैठक याआधीच बोलवायला हवी होती. लडाखच्या सीमेवर चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे अशा बातम्या ५ मे रोजी आल्या होत्या. तेव्हाच ही बैठक व्हायला हवी होती.

चीनला तोडीस तोड उत्तर देण्याचा निर्धारचीनला तोडीस तोड उत्तर द्यायचे असे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आयोजिलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमताने ठरविण्यात आले. या बैठकीला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वीस राजकीय पक्षांचे प्रमुख तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित होते. गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndian Armyभारतीय जवान