शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 11:13 IST

भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली.

ठळक मुद्देभारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायमचीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे

नवी दिल्ली - लडाखमध्ये घुसखोरीच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव कायम आहे. एकीकडे दोन्ही देशामधील वातावरण शांत असले तरी चीनकडून सातत्याने नवनव्या चाली खेळल्या जात आहेत. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली. या बैठकीमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारीबाबत चकार शब्द न काढता भारतालाच पँगाँग त्सो येथून माघार घेण्यास सांगितले, दरम्यान, भारताने चीनचा हा प्रस्ताव स्पष्टपणे धुडकावून लावला आहे.भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायम आहे. चीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले आहे. मात्र भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.पँगाँग त्सो परिसरात फिंगर ४ च्या अलीकडे भारताच्या नियंत्रणाखालील भाग आहे. मात्र मे महिन्यामध्ये चिनी सैन्य हे फिंगर चार पर्यंत आले होते. दरम्यान, चर्चेनंतर चिनी सैन्य फिंगर पाच पर्यंत माघारी गेले. पण चिनी सैन्य भारतीय लष्कराला फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्यास मनाई करत आहे.दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील गटाने या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यानंतर हॉटलाइनवरून हा प्रस्ताव फेटाळत असल्याचे चीनला सांगण्यात आले.रविवारी झालेल्या चर्चेतही चीनने पँगाँस त्सोमधून माघार घेण्यास नकार दिला होता. तर भारताने एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने माघार घेण्याची आणि एप्रिलमध्ये एलएसीवर असलेली यथास्थिती कायम करण्याची अट घातली होती. दरम्यान, हॉट स्प्रिंगमधील पेट्रोलिंग पॉईंट १७ आणि १७ ए येथून चिनी सैन्य अद्याप मागे सरलेले नाही. तसेच डिसइन्गेजमेंट प्रक्रियेचे पालन करत नाही आहे.दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेत स्थळावर एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज अपलोड केला आहे. त्यामध्ये मे महिन्यापासून चीन एलएसीवर आक्रमकता वाढवत आहे. गलवान खोरे, पँगाँग त्सो, गोगरा हॉट स्प्रिंगसारख्या क्षेत्रात चीनची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीन