शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारताच्या लडाख बॉर्डरजवळ चीनकडून पुन्हा षडयंत्र; सॅटेलाईट फोटोतून ड्रॅगनचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:56 IST

चीन आणि भारतच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतीय जवान देशाचं संरक्षण करत असतात मात्र अनेकदा चीनच्या छुप्या कुरघोडी समोर येतात. 

एकीकडे बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर त्याचे परिणाम भारतावर होत आहेत तर दुसरीकडे ड्रॅगन चीननेही सीमेवर भारताविरोधात षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीनच्या सैन्यानं सहा नवीन हेलीस्ट्रिप बनवल्या आहेत. सॅटेलाईट फोटोतून याबाबतचा खुलासा झाला आहे. ज्या जागेवर या हेलीस्ट्रिप बनवण्यात आल्यात. ती जागा वेस्टर्न तिबेटमध्ये आहे. लडाखच्या डेमचोकपासून हे हेलीस्ट्रिप १६० किमी अंतरावर आहे ज्यामुळे धोका आणखी जास्त वाढला आहे. सध्या भारत सरकारकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. 

गेयायी नावाच्या जागेवर हे हेलीस्ट्रिप बनवण्यात आलं आहे. याठिकाणी अद्याप बांधकाम पूर्ण झालं नाही. हेलीस्ट्रिप बनवण्याची सुरुवात एप्रिल २०२४ मध्ये झाली होती. फोटोतून स्पष्ट दिसते की, इथं ६ हेलीस्ट्रिप तयार केले जात आहेत. त्याचा अर्थ इथून १-२ नव्हे तर ६ ते १२ हेलिकॉप्टर एकत्रच तैनात केले जाऊ शकतात. ही जागा लडाखच्या डेमचोकपासून १६० किमी आणि उत्तराखंडच्या बाराहोतीहून २०० किमी अंतरावर आहे. डेमचोक येथे भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

चीनचं सैन्य नेहमी वास्तविक नियंत्रण रेषेजवळ हेलिपॅड अथवा बांधकाम करत असते. मागील काही वर्षात सीमेजवळील भागात चीननं रस्त्यांचे जाळे बनवले आहे. भारतानेही लडाखच्या चीन सीमेवर देखरेख वाढवली आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने याठिकाणी जवानांची संख्याही वाढवली आहे. या भागात भारताकडून रस्त्यांचे जाळे पसरवले जात आहे. भारताने अनेक अत्याधुनिक शस्त्रेही या भागात ठेवली आहेत. 

दरम्यान, चीनचा हा काळा कारनामा पहिल्यांदाच समोर आला नाही. जुलैमध्येही चीनच्या सैन्याकडून पूर्व लडाखच्या पँगोंग सरोवराजवळ खोदकाम सुरू होते. याठिकाणी अंडरग्राऊंड बंकर बनवली जात असल्याचं बोलले जाते जेणेकरून हत्यारे, इंधन, वाहने स्टोअर करण्यासाठी मजबूत शेल्टर बनवलं जाईल. सॅटेलाईट इमेजद्वारे याचाही खुलासा झाला होता. ज्याठिकाणी बंकर बनवलं जात होतं तिथे मे २०२० पासून ओस पडलं आहे. याच भागात चीनचा सिरजाप बेस कॅम्प आहे जिथे सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन