शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
3
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
4
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
5
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
6
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
7
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
8
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
9
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
10
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
11
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
12
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
13
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
14
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
15
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
16
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
17
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
18
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
19
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
20
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

India China FaceOff: भारतीय सीमेजवळ चीननं उभारले ५०० ‘मॉडेल व्हिलेज’; जाणून घ्या ड्रॅगनचा मास्टरप्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 2:10 PM

गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर सिक्किम इथं दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. परंतु चीनचा स्वभाव पाहून भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.

ठळक मुद्देडोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेट इथं स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केलीचीनने सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात वेगाने बांधकाम करण्यास सुरुवातया मॉडेल गावाचं बांधकाम चीनने अगदी हुशारीने केले आहे. जेणेकरून बंकर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो

नवी दिल्ली – भारताच्या सीमेवर चीननं आतापर्यंत ५०० मॉडेल गाव उभारले आहेत. मॉडेल गावाच्या आडून चीन सैन्याचं बंकर बनवत आहे. गावच्या विकासातून मागून सीमेपर्यंत पक्के रस्ते तयार करुन घेत आहे. तर सिक्किममध्ये भारत, चीन आणि भूतान यांच्यात डोकलाम इथं फेस ऑफनंतर भारत-चीन यांच्या सैन्यात चकमक सुरुच आहे. मागील ६ महिन्यात भारत-चीन दोन्ही सैन्य एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. परंतु लष्कराकडून याबाबत कुठलीही माहिती जाहीर करण्यात येत नाही.

गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर सिक्किम इथं दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. परंतु चीनचा स्वभाव पाहून भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. डोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेट इथं स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. चीनने सिक्किमनजीक २०१७ पासून वेगाने रस्ते आणि बांधकामाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्करी सूत्रांनुसार, भारत-चीन यांच्यातील तणावाची सुरुवात सिक्किमच्या नाकुला इथं झाली. त्यानंतर डोकलाम आणि गलवान इथे झटापट झाली.

अशावेळी चीनने सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात वेगाने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. डोकलाम इथं चिनींचा डाव उधळला त्यानंतर गलवानमध्येही चीनला पळता भुई केली. त्यामुळे चीनने आता सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. आता चीनने भारत सीमेवर मूळ तिबेटी लोकांना तैनात केले आहे. विशेषत: इतक्या उंचीवर लढाई करण्यासाठी मूळ तिबेटी लोक चिनी सैन्यापेक्षा माहीर आहेत. चीनने भारत सीमेवर मॉडेल व्हिलेज बनवण्यास सुरुवात केली आहे. केवळ उत्तर सिक्किम सीमेजवळ चीनने ३ मॉडेल गाव तयार केले आहेत.

मूळ तिबेटी लोकांना वसवण्याची योजना

या मॉडेल गावात मूळचे तिबेटी असलेल्या लोकांना वसवण्याची योजना आहे. परंतु या मॉडेल गावाचं बांधकाम चीनने अगदी हुशारीने केले आहे. जेणेकरून बंकर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु भारत चीनच्या या करकुतींना जाणून आहे. त्यामुळे भारतानेही तयारी सुरु केली आहे. उत्तर सिक्किम इथे एकमेव तिबेटी पठार भारतीय सीमेत आहे. याठिकाणी भारतीय बंकर पूर्ण तयारीत आहेत. चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. प्रत्येक अत्याधुनिक हत्यारं याठिकाणी भारतीय सैन्याला देण्यात आली आहेत.

परंतु या पठारावर केवळ चीनशी मुकाबला नाही तर हवामानही मोठा शत्रू आहे. भारतीय सैन्याचे बंकर १६ हजार ते २० हजार फूट उंचावर आहेत. इतक्या उंचीवर ऑक्सिजनची पातळीही कमी होते. अतिशय थंड वातावरण जीवघेणं ठरू शकतं. त्यासाठी जवानांना विशेष ट्रेनिंग दिली जाते. त्याचसोबत रोटेशनपद्धतीने त्यांची ड्यूटी लावली जाते. याठिकाणी बोफोर्स, अर्जुन टँक तैनात केलेत. भारताची सीमा चार देशांना लागून आहे. भुतान, नेपाळ, बांगलादेश आणि चीन. यात सर्वात धोकादायक चीन आणि सिक्किम सीमेपासून २२६ किमी अंतरावर जास्त धोका आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारत