शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

India China FaceOff: पँगाँग सो, डेपसांगमधून मागे हटण्यास चीनचा नकार; सैन्याची पाचव्या फेरीतील बैठक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 08:13 IST

India China FaceOff: भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची प्रस्तावित बैठक आठवडाभर पुढे ढकलली

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही. पँगाँग सो, डेपसांगमधून माघार घेण्यास चिनी सैन्यानं नकार दिला आहे. याशिवाय चीननं अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांत होणारी लष्करी बैठक रद्द करण्यात आली आहे. कमांडर स्तरावरील ही बैठक आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे.१४ कॉर्प्स कमांडर जनरल हरिंदर सिंह आणि चिनी मेजर जनरल लुई लिन यांच्यात ५ व्या फेरीतील चर्चा होणार होती. मात्र चीनचा सीमेवरील पवित्रा पाहता भारतानं या बैठकीसाठी फारसा आग्रह धरला नाही. ३० जुलैला भारत आणि चिनी सैन्यात बैठक होणार होती. पँगाँग सो आणि डेपसांगमधून चीन माघारी न हटण्यामागे दोन कारणं असू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १४ जुलै दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची चर्चा झाली. ही चर्चेची चौथी फेरी होती. त्यात सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली. मात्र त्याच्या अंमलबजावणीवरून अद्याप चीन अद्याप द्विधा मनस्थितीत आहे. यासोबतच चीनला हा वाद हिवाळ्यापर्यंत लांबवायचादेखील आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पँगाँग सो आणि डेपसांगमधून माघार घेण्यास चीननं दिलेला नकार आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील चिनी सैन्याची वाढती संख्या यामुळे भारतीय जवान अलर्टवर आहेत. याशिवाय भारतीय नौदलदेखील सतर्क आहे. हिंदी महासागरातील नौदलाचा वावर वाढला आहे. पूर्व लडाखमधील तणाव दीर्घ काळ चालेल, या अनुषंगानं भारतीय जवान सज्ज झाले आहेत.चीनसोबत ४ वेळा सैन्य स्तरावर चर्चापूर्व लडाखमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं वादग्रस्त भागांमधून सैनिकांनी माघारी घ्यावी यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आता चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. ५ जुलैला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवरून २ तास चर्चा झाली. दोन्ही देशांच्या सैन्यातील तणाव निवळण्याच्या हेतूनं ही चर्चा झाली. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश