शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा भारताने फेटाळला; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:44 IST

भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे

ठळक मुद्देभारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाहीमे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहेचीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला

नवी दिल्ली – लडाख सीमेवर सुरु असलेल्या भारतचीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गलवान खोऱ्यावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. गलवानमध्ये एलएसीवरुन चीन सरकारने केलेला दावा चुकीचा आहे. गलवानवर केलेला दावा चीनच्या आधीच्या भूमिकेविरुद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे. भारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाही. भारतीय जवान या परिसरात अनेक काळापासून कोणत्याही घटनेशिवाय पेट्रोलिंग करत आहे. मे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. त्यामुळे ग्राऊंड पातळीवर कमांडर्समध्ये संवाद सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच चीनने एलएसीवरुन भारतावर केलेला आरोप तथ्यहिन आहे. भारत कधी एकपक्षीयपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यामुळे चीनचा हा तर्क चुकीचा आहे. मे महिन्याच्या मध्यात चीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नांना आमच्याकडून सडेतोड उत्तर दिले गेले. त्यानंतर दोन्हीकडून राजकीय आणि लष्करी माध्यमातून सुरु असणाऱ्या चीनच्या कारवायांबद्दल संवाद सुरु झाला असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

दरम्यान, ६ जून रोजी कमांडर स्तरीय बैठकीत तणाव कमी करणे आणि मागे हटण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांनी एलएसीचा सन्मान ठेवणे आणि सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असं समझोता झाला. त्यानंतर चीनकडून बैठकीत झालेला तडजोडीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने १५ जून रोजी गलवान खोऱ्यात हिंसक घटना घडली. त्यात देशाचे २० जवान शहीद झाले असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

त्याचसोबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा १७ जूनला संवाद झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावरुन भारताकडून कडाडून विरोध केला. भारताने चीनकडून केलेले दावे आणि वरिष्ठ कमांडरस्तरीय बैठकीतील चुकीच्या गोष्टी नाकारल्या. चीनला चिंतन करणे गरजेचे आहे असंही भारताने सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये जबाबदारीने समस्या सोडावली जाईल आणि ६ जूनच्या बैठकीत मागे हटण्याचं ठरल्याप्रमाणे करण्याबाबत सहमती झाली. सध्या दोन्ही बाजूने सातत्याने संपर्क ठेवला जात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन