शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:38 IST

सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील चुशूल येथे चीनने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे संरक्षणविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने सज्ज राहावे, असे आदेश नरवणे यांनी दिल्याचे कळते.सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पँगाँग सरोवरानजीकच्या भागातही चीनने घुसखोरीचा प्रयत्न चालविला असून, तेथील महत्त्वाच्या भागांवर आता भारतीय सैनिकांनी आता मोर्चेबांधणी केली आहे. या सर्व स्थितीचा आढावा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखमधील सैन्याधिकाऱ्यांकडूनघेतला.1962च्या युद्धात चीनने हिसकावून घेतलेली काही पर्वतशिखरेही भारतीय लष्कराने नुकतीच एक गोळी न झाडताही आपल्या ताब्यात घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मोहीम २९ व ३० आॅगस्टच्या रात्री पार पाडण्यात आली.लडाखच्या सीमेवर भारताने अतिरिक्त सैन्य पाठविले असून, अक्साई चीनच्या भागात चीनच्या हवाई दलाच्या विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने या भागात विमानवेधी तोफा, तसेच अन्य प्रकारची शस्त्रास्त्रेही तैनात केली आहेत, तसेच त्यांची संख्या वाढविली आहे.1598 कि.मी. लांब लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. पूर्व लडाखमधील गलवान येथे चिनी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला असता, त्यांना अडविताना झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.सीमेवरील परिस्थितीचीखरी माहिती द्यावी80 कि़मी. दूरवर चीनचे लष्कर असून, लडाखच्या लेहमधील नेमकी परिस्थिती काय आहे, हे मोदी सरकारने साºया देशाला सांगावे, अशी मागणी लडाखचे माजी आमदार डेल्डन नामग्याल यांनी केली आहे.लडाखच्या सीमेवर चीन व भारताचे सैन्य अत्यंत आक्रमक पवित्र्यात समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली आहे, हे आता मो दी सरकारने मान्य करायला हवे, असेही ते म्हणाले.२० जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावmanoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानladakhलडाख