शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:45 IST

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार

नवी दिल्ली: चीनच्या आडमुठेपणामुळे पूर्व लडाख सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापतींचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे. संघर्ष झाल्यास भारताचा पराभव निश्चित, आम्ही कोणताही दबाव घेणार नाही, अशी दर्पोक्ती चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं केली. सध्याच्या घडीला सीमेवर दोन्ही बाजूंनी ५० हजार जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे हिवाळ्यातही दोन्ही बाजूनं सैन्य तैनात असेल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हट्ट चिनी सैनिकांना महागात पडू शकतो. यामागे अनेक कारणं आहेत.

बर्फाळ आणि उंच भागांमध्ये सरावाचा अभावहिवाळ्यात पूर्व लडाखमधील तापमान उणे ३० डिग्रीपर्यंत घसरेल. लडाखमधील भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चिनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. चिनी सैनिकांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. याच आजारामुळे चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अवघे ६ महिनेच लडाखमधील आव्हानात्मक स्थितीचा सामना करता आला. चीननं गेल्या ९ महिन्यांत तीनदा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर बदलले आहेत. पश्चिम थिएटर कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची जबाबदारी आहे.

भारतीय जवान चीनवर भारी पडणारभारतीय लष्कराचे जवान उंच भागांमध्ये होणाऱ्या युद्धांत अतिशय निष्णात आणि तरबेज असल्याचं वॉशिंग्टनस्थित अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या बाबतीत चिनी सैनिक भारताच्या आसपासदेखील टिकत नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं युद्धक्षेत्र अशी ओळख असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. दुर्गम डोंगराळ भागांत भारतीय जवान युद्धाचा सराव करतात. सियाचिनमधील परिस्थिती लडाखपेक्षा कितीतरी पट अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघर्ष झाल्यास भारतीय जवान मोठी आघाडी घेऊ शकतात.

टूटू रेजिमेंटमध्ये भारताकडे आघाडीलडाखमधील अवघड भौगोलिक स्थितीत संघर्ष झाल्यास भारताच्या टूटू रेजिमेंटची स्थिती उत्तम आहे. या रेजिमेंटची फारशी माहिती कोणाकडेच नाही. या रेजिमेंटचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. यामध्ये आधी तिबेटींचा भरणा होता. आता गोरखा जवानदेखील या रेजिमेंटचा भाग आहेत. या रेजिमेंटची स्थापना १९६२ मध्ये झाली. रेजिमेंटमध्ये स्थानिकांचं प्रमाण खूप आहे. त्यांना तिथल्या परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव