शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

India-China: मोठी बातमी! पूर्व लडाखमधून भारत-चीनची माघार; 2020च्या हिंसक चकमकीपासून सुरू होता तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 21:17 IST

India-China: 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता.

India-China: मे 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. पण, आता सुमारे 28 महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथील ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. लष्कर आणि सॅटेलाईट इमेजमधूनही याची पुष्टी झाली आहे. या भागातील तात्पुरती बांधकामे आणि बंकरही पाडण्यात आले आहेत.

दोन्ही देशांच्या स्थानिक कमांडर्सनी ग्राउंड स्तरावर आढावा घेतल्यानंतर याला दुजोरा दिला आहे. पीपी 15 मधून सैन्य मागे घेण्याबाबत लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने या भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी सीमेवर झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांचे 50,000 हून अधिक सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. पण, आता सैनिक मागे हटणार आहेत. 

यापूर्वी, भारत आणि चीनच्या सैन्याने पेगॉन्ग लेकच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वादग्रस्त जागेवरून माघार घेतली होती. मात्र, अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आजही पूर्वीच्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी जात नाही. लष्कर आमने-सामने येऊ नये, यासाठी बफर झोन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही देशांचे सैन्य तणाव टाळू शकतील. लष्कराच्या म्हणण्यानुसार, आता चीनसोबत डेमचोक आणि डेपसांगबाबत चर्चा केली जाईल, हा वाद गलवानच्या आधीपासून आहे. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान