शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
2
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
3
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
4
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
5
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
6
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
7
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
8
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
9
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
10
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
11
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
12
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
13
नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
15
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
16
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
17
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
18
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
19
Archery world Cup Final : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या दीपिकाचा पदकावर निशाणा; रौप्य पदकाची कमाई
20
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत

भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:57 PM

LAC संदर्भात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

India China Relations : गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. पण, आता हा वाद कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे, भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 22-23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ही महत्त्वाची घडामोड आहे.

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, 'गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. एलएसी मुद्द्यांवर आमचा चीनशी करार आहे. सैन्य मागे घेण्यासाठी आणि परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार काम करत आहोत.'

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, 'गस्तीबाबतच्या करारानंतर दोन्ही देशांमधील एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू पर्कात आहे.

2020 पासून वाद वाढलापूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15-16 जून 2020 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले, तर चीनी सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. पण, आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन