शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

India China FaceOff: राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 7:40 PM

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे

ठळक मुद्देवीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे?काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला सवाल सोनिया गांधींच्या उपस्थित राहुल गांधींच्या विधानावर पवारांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारतीय सैनिकांमधील झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीमुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी मागणी देशातील नागरिक करत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी चीनच्या राष्ट्रपतींचे पुतळे जाळून निषेध केला तर चीनच्या वस्तूंबाबत बॉयकॉट चीन हा ट्रेंडही सुरु करण्यात आला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. एकीकडे चीनने भारताचे बंधक बनवलेले १० सैनिकांची सुटका केली आहे. तर दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलं नाही असं सांगितले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील मेजर जनरल स्तरीय बैठक पुन्हा सुरु झाली आहे. ही बैठक चीनने भारताच्या १० सैनिकांची सुटका केल्यानंतर सुरु केली आहे. भारताच्या दबावामुळे चीनने हे सैनिक सोडल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी हत्यार वापरलं की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय कराराशी होता आणि अशा संवेदनशील प्रकरणाचा सन्मान करण्याची गरज आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करत सैनिकांना नि:शस्त्र का पाठवण्यात आलं असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत भाष्य केले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले राहुल गांधी?

आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.

जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी