शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 2:43 PM

देशातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव

वॉशिंग्टन: भारतात 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याशिवाय योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी केलेली कमी तरतूद, न परवडणारी औषधं यामुळे भारतातील गरिबी वाढते, असं सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या अमेरिकन संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारतातील 65 टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्यानं दरवर्षी 5 कोटी 70 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात, अशी आकडेवारी सीडीडीईपीच्या अहवालात आहे. जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू औषधांअभावी मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. सीडीडीईपीच्या संशोधकांनी युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या संदर्भातला अहवाल तयार केला. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या देशातील आरोग्य सुविधा दुय्यम दर्जाच्या असल्याची बाब सीडीडीईपीच्या संशोधकांच्या लक्षात आली. याशिवाय या देशांमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्ग फारसा प्रशिक्षित नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. भारतात डॉक्टरांचं प्रमाण अतिशय कमी आहे. देशात दर 10,189 व्यक्तींमागे  केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर 1000 व्यक्तींमागे 1 डॉक्टर उपलब्ध असायला हवा. मात्र भारतात तब्बल 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय दर 483 व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात 20 लाख नर्सेसची कमतरता आहे.   

टॅग्स :Healthआरोग्य