शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 19:37 IST

4 Trillion Dollar Economy: भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचा दावा अनेक भाजप नेत्यांनी केला आहे.

4 Trillion Dollar Economy: काल माध्यमांमध्ये एक बातमी व्हायरल झाली, ज्यात भारताच्या जीडीपीने $ 4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सोमवारी(20 नोव्हेंबर) सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की, फक्त खळबळ माजवण्यासाठी या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या.

 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेत होता. यावेळी, राजस्थान आणि तेलंगणातील वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी एक ट्विट केले. त्यात भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले' हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, हा फक्त खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. 

नवा भारत प्रगती करतोय - देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला होता की, भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यावरून मोदी सरकारची गतिमानता आणि दूरदर्शी नेतृत्व दिसून येते. नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे, असे ते म्हणाले होते.

भारतासाठी अभिमानाचा क्षण – गजेंद्र सिंह शेखावतकेंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले होते की, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आपला जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय खरोखरच अनोखा आहे.

5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल - जी किशन रेड्डी

याला मोदींची हमी म्हणत कॅबिनेट मंत्री जी किशन रेड्डी यांनी लिहिले की, आम्ही 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - गौतम अदानी

X वर स्क्रीनशॉट शेअर करताना गौतम अदानी यांनी लिहिले, अभिनंदन भारत, फक्त दोन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आम्ही जपानची 4.4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि जर्मनीची 4.3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था मागे टाकू. तिरंगा फडकतच राहील, जय हिंद.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस