शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

By admin | Published: July 20, 2016 9:35 AM

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तान एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती. 13 जूनला हल्ल्याची सर्व तयारी पुर्ण झाली होती. भारतीय हवाई दल संपुर्ण ताकदीनिशी पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या एअरबेसवर हल्ला करणार होतं. मात्र हल्ला करण्याची सूचना न मिळाल्याने ही योजना रद्द करावी लागली.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सर्व ठिकाणं भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होती. 16 विमानं पुर्ण तयार ठेवण्यात आली होती. हल्ला करण्याचा मार्गही तयार होता. सर्व वैमानिकांना खासगी रिव्हॉल्वर लोड करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. वैमानिकांजवळ पाकिस्तानी चलनाचीदेखील व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. जेणेकरुन आपातकालीन परिस्थितीत विमानातून उतरावं लागलं तर त्यांना सुरक्षित निघता यावं. 
 
जर भारताकडून हा हल्ला झाला असता तर दोन्ही देशांत खुप मोठं युद्ध पेटलं असत. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे दोन्ही देशाचे तत्कालीन पररारष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि सरतात अझीज यांच्यामधील संवादप्रक्रिया बंद झाली होती. यानंतरच भारतीय हवाई दलाने ही योजना आखली होती. युद्ध थांबवायचं असेल तर कारगीलमधी पाकिस्तानी घुसखोरांना हटवण्यात यावं, तसंच कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत 6 जवानांचे हाल करणा-यांना शिक्षा दिली जावी असा स्पष्ट संदेश सरतात अझीज यांना देण्यात आला होता. 
 
भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्ये याची नोंददेखील आहे. संवादप्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर 12 जूनला सरताज अझीज माघारी गेले होते. 13 जूनला हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. हवाई दलाच्या 17 स्क्वॉड्रन  डायरीत याची नोंद आहे. 1971 नंतप प्रथमच भारतीय हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करणार होतं. सकाळी 4.30 वाजेपर्यंत सर्वजण तयारीत होती. पण कोणतीच सूचना आली नाही. 12.30 वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली, मात्र सूचना न आल्याने हल्ल्याची योजना रद्द करण्यात आली.