शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुरक्षेसाठी योग्य कारवाईचा भारताला पूर्णपणे अधिकार- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 07:13 IST

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला.

मॉस्को : चीननेभारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करून दोन्ही देशांत झालेल्या करारांचा भंग केला आहे. त्यामुळे चीनने आपले सैन्य पूर्णपणे माघारी न्यावे असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निक्षून सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी उचित कारवाई करणे हा आमचा हक्क आहे असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. तर आम्ही एकही इंच भूमी सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे.

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या घटनेपासून भारत व चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या समस्येवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह व चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे यांच्यात शुक्रवारी मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. पण चीनने अडेलतट्टूपणाची भूमिका कायम ठेवल्याने या चचेर्तून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या बैठकीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे तसेच इतर देशांचे नेतेही रशियाच्या दौºयावर आले आहेत.या बैठकीनंतर चीनने एका पत्रकात म्हटले आहे की, सीमेवरील तणावास संपूर्णपणे भारतच जबाबदार आहे. आमच्या हक्काची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे असे चीनने म्हटले आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने म्हटले आहे की, सीमेवर चीनने आक्रमक भूमिका घेत अनेक हालचाली सुरू आहेत. या गोष्टींमुळे दोन्ही देशांतील करारांचा चीनने भंग केला आहे.चीनकडून भारतीयांचे अपहरणअरुणाचल प्रदेशलगतच्या सीमाभागातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या पाच भारतीय नागरिकांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याची चर्चा आहे. ही घटना या राज्यातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील नाचो भागामध्ये शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतchinaचीन