शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 12:03 PM

आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे असं भारताने म्हटलं. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत दहशतवादावरूनभारतानंपाकिस्तानची खरडपट्टी काढली आहे. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. जगातील सुरक्षेवर त्याचे मोठे आव्हान आहे. क्रॉस बॉर्डर नेटवर्कही त्यापैकी एक आहे. दहशतवाद्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची ताकद वाढवली आहे. ते आज अत्याधुनिक हत्यारे वापरत आहेत. एकमेकांच्या साहाय्याने दहशतवादाला हरवलं जाऊ शकते असं सांगत भारतानेपाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या खतपाणीवर कठोर भाष्य केले आहे.

भारताने पुढे म्हटलं की, दहशतवादाशी कसं लढायचं यावर जगात अद्याप एकमत होऊ शकत नाही. दहशतवादावर ९/११ च्या हल्ल्यानंतर जगाला जाग आली. नोव्हेंबर १९९६ साली भारताने पहिल्यांदा जागतिक दहशतवादावर एक व्यापक चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास याला ३० वर्ष झाली तरीही सहमती बनली नाही. जेव्हा जगाने दहशतवादाला गांभीर्याने घेतले नाही तेव्हापासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. मागील ३ दशकात भारतात हजारो लोक मारले गेलेत. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, २०१६ साली पठाणकोट एअरबेसजवळ स्फोट, २०१९ मध्ये पुलवामात आत्मघातकी हल्ला हे  त्यातील एक आहे. भारत झीरो टॉलरेंस दाखवून दहशतावादाशी लढेल असं सांगण्यात आले.

तसेच आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे. अशा देशांमुळे दहशतवादाशी लढण्याच्या संकल्पाला धक्का पोहचतो. याच देशांमुळे १५ वर्षानंतरही २६/११ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आजही सरकारी सुविधेत वेगवेगळ्या देशात फिरतो. हे देश केवळ दहशतवादाला प्रोत्सहन देत नाही तर त्यांच्या सरकार आणि एजेन्सीकडून स्वत:साठी स्टेट पॉलिसी बनवतात असंही भारताने पाकिस्तानला नाव न घेता सुनावले आहे.

दरम्यान, आपल्या कुख्यात अजेंड्याकडे जगाचं लक्ष जावू नये यासाठी दिशाभूल करत हे देश स्वत: दहशतवादी पीडित असल्याचं जगाला दाखवून देत राहतात. संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंद असलेल्या दहशतवादी संघटना जशा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद भारताच्या जमिनीवर हल्ले करत राहतात. त्याविरोधात मजबूत कायदेशीर कारवाई करण्याची आजची गरज आहे असंही भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत म्हटलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ