शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

जगभरातील भारतीयामुळे देशाला ओळख मिळाली - नरेंद्र मोदी

By admin | Published: January 08, 2015 1:31 PM

जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले.

ऑनलाइन लोकमत

गांधीनगर, दि. ८ - जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले. तेराव्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनासाठी मूळचे भारतीय असलेले 'गुयाना'चे राष्ट्रपती डोनाल्ड रामोतार आपल्या पत्नीसह उपस्थित होते. 
' संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारताचे सामर्थ्य वाढले आहे. यापूर्वी आपले पूर्वज नवनव्या संधीच्या शोधात जगभरात गेले होते. मात्र आता अनिवासी भारतीयांना भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत. जगाला देण्यासारखे भारताकडे खूप काही आहे,असे मोदी म्हणाले. तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे मला माहीत आहे, त्यामुळे जगातील काही देशांना आगमनानंतर व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गांधींजींच्या विचारामुळे सर्व जगाला आज प्रेरणा मिळत असल्याचे सांगत मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही स्मरण केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीयांना 'गंगा सफाई' मोहिमेत योगदान देण्याचेही आवाहन केले. 
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- जगातील २०० हून अधिक देशात भारतीयांचे वास्तव्य आहे. त्यांच्या रुपाने संपूर्ण भारतच विदेशात रहात आहे.
- जगभरात जेथे जेथे संधी उपलब्ध होती, तेथे तेथे भारतीय गेले आहेत. मात्र आता नव्या संधीच्या शोधात बाहेर जाण्याची गरज नाही, आता भारतातच तुम्हाला संधी मिळेल.
- १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगभरातील लोकांना त्यांचे विचार प्रेरणादायी वाटतात. मॉरशिअसमध्ये आजही २ ऑक्टोबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.
- आपली संस्कृती, मूल्य आणि संस्कारांमुळे जगभरात भारतीय नावाजले जातात, त्यांचा आदर व प्रशंसा केली जाते.
- जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे. 
- प्रवासी भारतीयांना जे वचन देण्यात आले होते ते पूर्ण करण्यात आले. पीईओ कार्ड धारकांना आजीवन व्हिसा देण्याचे वचन पूर्ण केले.
- प्रवासी भारतीयांना आता दर आठवड्याला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावण्याची गरज नाही. 
-  अनेक देशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा सुरू करण्यात आली आहे.