शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

तरुणांसाठी भारत हे ‘पॉवर हाऊस’; देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करताना विकसित भारताचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास; विश्वाचा मित्र म्हणून देश पुढे येत आहे!

गांधीनगर : जागतिक स्थैर्यासाठी भारत हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जागतिक अर्थव्यवस्थेला गती देणारे एक इंजिन आहे, प्रतिभावान तरुणपिढीसाठी मोठे ‘पॉवरहाऊस’ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये परिषदेचे भरविली होती.

पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्व रेटिंग्ज एजन्सींना विश्वास वाटतो की येत्या काही वर्षांत भारताचा समावेश जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये होईल. भारत म्हणजे ग्लोबल साऊथचा आवाज आहे. जगभरात सर्वत्र अनिश्चितता असताना भारत एक आशेचा किरण बनून पुढे येत आहे. भारताने जगाला विश्वास दिला आहे की, आम्ही सर्वांच्या भल्यासाठी लक्ष्य निर्धारित करतो आणि ते पूर्ण करूनही दाखवतो. एकेकाळी जगात ११ व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानी पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)

यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेटर फियाला, मोझांबिकचे राष्ट्रपती फिलिप जॅसिंटो न्युसी, तिमोर-लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस होर्टा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि दिग्गज नेते यांच्यासह देशभरातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विश्वाचा मित्र म्हणून देश पुढे येत आहे

जागतिक समीकरणे वेगाने बदलत असताना विश्वाचा मित्र म्हणून भूमिकेत भारत पुढे येत आहे. जगाच्या कल्याण साधताना भारताची निष्ठा, प्रयत्न आणि परिश्रमांमुळे भविष्य अधिक सुरक्षित आणि समृद्ध बनत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अमृतकाळ ठरणार आहेत.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गुजरातमध्ये किती गुंतवणूक येणार?

  • उद्योगपती गौतम अदानी यांनी अदानी समूहाकडून पाच वर्षांत २४ अब्ज रुपयांची गु्ंतवणूक करण्याची घोषणा केली. ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये समूह १० वर्षांत १०० अब्ज रुपये गुंतवणार आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पहिला कार्बन फायबर फॅसिलिटी प्रकल्प हजिरा येथे सुरू करण्याची घोषणा केली. 
  • टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी धोलेरामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. २० जिगाव्हॅट क्षमतेचा लिथियम आयन स्टोअरेज बॅटरी फॅक्टरी दोन महिन्यात सुरू करण्याची घोषणा केली.
  • सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी ३५ हजार कोटी गुंतवणूक करून दुसरा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली.
  • आर्सेलर-मित्तल कंपनीचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी जगातील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प हजिरा येथे २०२९ पर्यंत सुरू करण्याची घोषणा केली. यातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. 
  • नेदरलँड आणि सिंगापूर येथील कंपन्यांनी या आर्थिक वर्षात ७ अब्ज रुपये गुंतवण्याची घोषणा केली.

नरेंद्र मोदी सर्वांत यशस्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान आहेत. रिलायन्स ही एक गुजराथी कंपनी होती आणि नेहमीच राहील. १० वर्षांत रिलायन्सने १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यातील एकतृतीयांश गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये करण्यात आली. गुजरात २०४७ पर्यंत ३ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, तसेच भारत ३५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल.-मुकेश अंबानी, चेअरमन, रिलायन्स इंडस्ट्रीज

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात