शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 1:24 PM

नागरिक गरिबी, उपासमार, बेरोजगारी व महागाईने त्रस्त असल्याचं व्यक्त केलं मत

नागपूर/नवी दिल्ली : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि समृद्ध देश असूनही येथील लोकसंख्या गरिबी, उपासमार, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाईचा सामना करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी म्हटले आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेला श्रीमंत देश आहोत. आपला देश समृद्ध आहे, पण तेथील लोकसंख्या गरीब आहे जी उपासमार, बेरोजगारी, महागाई, जातिवाद, अस्पृश्यता आणि इतर अनेक समस्यांना तोंड देत आहे जे समाजाच्या प्रगतीसाठी चांगले नाही.

ग्रामीण भागात संधींचा अभावआरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशातील १२४ जिल्हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत मागे आहेत. देशात शहरी भागात खूप विकास झाला आहे; मात्र ग्रामीण भागात सुविधा आणि संधींचा अभाव असल्याने मोठी लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे.

कमी पगार अन् महागाईने मंदीवाढती महागाई आणि पगारात सतत कपात झाल्याने मंदीची भीती वाढली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारत