शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:50 AM

परिस्थितीतील मूलभूत व अनपेक्षित बदलांमुळे ही प्रक्रिया गरजेची आहे, असे भारताने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सीमेपलीकडून होणारा दहशतवाद तसेच लोकसंख्येत तसेच पर्यावरणात झालेले बदल लक्षात घेता, सिंधू जलकराराचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे, असे भारतानेपाकिस्तानला कळविले आहे. परिस्थितीतील मूलभूत व अनपेक्षित बदलांमुळे ही प्रक्रिया गरजेची आहे, असे भारताने म्हटले आहे.

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

या संदर्भात सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले की, या प्रकरणी सिंधू जलकराराच्या कलम १२ (३) अंतर्गत भारताने पाकिस्तानला ३० ऑगस्ट रोजी नोटीस बजावली आहे. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत व पाकिस्तानने नऊ वर्षांच्या चर्चेनंतर १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जलकरारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या करारावर जागतिक बँकेचीही स्वाक्षरी आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा ओलांडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचे कशा पद्धतीने वाटप करावे, याबाबत या कराराद्वारे विशिष्ट पद्धती ठरविण्यात आली होती.

फेरआढावा का?

लोकसंख्या, पर्यावरणाच्या समस्या यांत झालेले बदल व स्वच्छ ऊर्जेच्या विकासाला चालना देण्याची गरज या गोष्टींमुळे तसेच किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांबाबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्यायला हवा, असे भारताने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये चर्चा आवश्यक : भारत

भारताने सिंधू जलकराराबाबतचा वाद सोडविण्यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन प्रक्रियेचा आधार घेतला नाही. सिंधू जलकराराचा फेरआढावा घेण्याकरिता दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये चर्चा व्हावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत