शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 19:56 IST

...खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

मोहम्मद मुइज्जू गेल्या वर्षी मालदीवचे राष्ट्रपती झाल्यापासूनच नवी दिल्ली आणि मालदिवचे संबंध बिघडले आहेत. आता मोदी सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मालदीवला मोठा धक्का दिला आहे. भारताने मालदीवच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. तर दुसरा बाजूला शेजारील भूतानसाठी बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद केली आहे. भारताच्या या निर्णयामुळे, चीनशी जवळीक साधणाऱ्या मुइज्जूची मग्रुरी ठिकाणावर आली आहे. खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

भारताने केंद्रीय अर्थसंकल्पात शेजारील देशांना दिल्या जाणाऱ्या विकास निधीत, भूटानसाठी 2,068 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मालदीवला केवळ 400 कोटी रुपयेच दिले आहेत. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातही मालदीवला 400 कोटी रुपयेच देण्यात आले होते. मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सुधारित अर्थसंकल्पात ही रक्कम वाढून 770 कोटी झाली होती. 

अर्थात भारताने गेल्या वर्षात मालदिवमध्ये विकास कामांसाठी 770 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, आता 2024-25 च्याअर्थसंकल्पात ही रक्कम 400 कोटीच ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर मालदीवमध्ये राहणाऱ्या भारतीय सैनिकांना परत पाठवले होते. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. महत्वाचे म्हणजे, मुइज्जू हे चीनचे समर्थकही मानले जातात.

तसेच इतर देशांचा विचार करता भारताने आपल्या अर्थसंकल्पात, बांगलादेशसाठी 120 कोटी रुपयांची, मॉरिशससाठी 370 कोटी रुपयांची, म्यानमारसाठी 250 कोटी रुपयांची, श्रीलंकेसाठी 245 कोटी रुपयांची, अफगाणिस्तानसाठी 200 कोटी रुपयांची, आफ्रिकी देशांसाठी 200 कोटी रुपयांची तर, लॅटिन अमेरिकन देशांसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024MaldivesमालदीवBhutanभूतान