शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

'चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण हवे', शहबाज शरीफांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 6:36 PM

Ind Vs Pak Talks: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Narendra Modi Vs Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांनी मंगळवारी भारताशी पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गंभीर मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने चर्चा होईपर्यंत दोन्ही देश 'सामान्य शेजारी' होऊ शकत नाहीत, असे शाहबाज म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारतालाही आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण त्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक आहे. आम्ही रिपोर्ट पाहिली, सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवेत, अशी भारताची भूमिका आहे. त्यासाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण गरजेचे आहे.

मंगळवारी पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते की, सर्व गंभीर आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी त्यांना भारतासोबत चर्चा करायची आहे. दोन्ही देश गरिबी आणि बेरोजगारीशी लढत असल्याने युद्ध हा दोन्ही देशांसाठी पर्याय नाही. काश्मीरसह सीमापारचा दहशतवाद आणि भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे वक्तव्य आले आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद