शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:13 IST

तीन वर्षांत टपाल खात्याच्या तोट्यात 150 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली: टपाल खात्यानं तोट्याच्या बाबतीत बीएसएनएल, एअर इंडियाला मागे टाकलं आहे. 2018-19 मध्ये टपाल खात्याचा तोटा 15 हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये टपाल खात्याचा तोटा 150 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे आता भारतीय पोस्ट ही सर्वाधिक तोट्यात असलेली सरकारी कंपनी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य भत्ते यांच्यावर होणाऱ्या खर्चामुळे टपाल खातं तोट्यात असल्याचं सांगितलं जात आहे. वेतन आणि भत्त्यांवर पोस्टाला दरवर्षी आपल्या महसूलापैकी 90 टक्के रक्कम खर्च करावे लागतात. पोस्ट खात्यानंतर बीएसएनएलचा तोटा सर्वाधिक आहे. 2018-19 मध्ये बीएसएनएल कंपनीला 7 हजार 500 कोटींचा तोटा झाला. तर 2017-18 मध्ये एअर इंडियाला 5,337 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पोस्ट खात्याला 2018-19 मध्ये 18 हजार कोटींचा महसूल मिळाला. यातील 16,620 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्त्यावर खर्च झाले. याशिवाय बीएसएनएलला वर्षाकाठी 9,782 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर खर्च करावे लागतात. बीएसएनएल दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांवर 26,400 कोटी रुपये खर्च करतं. 2020 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 17,451 कोटी रुपये आणि निवृत्ती वेतनावर 10,271 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. या काळात कंपनीचं उत्पन्न 19,203 कोटी रुपये असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बीएसएनएलचा पाय आणखी खोलात जाणार आहे.  

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसBSNLबीएसएनएलAir Indiaएअर इंडिया