शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
2
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
3
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
4
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
5
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
7
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
8
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
9
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
10
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
11
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
12
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
13
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
14
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
15
८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
16
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
17
‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
18
सी-लिंकवर महागड्या कारची लागली रेस; वाहतूक एक तास खोळंबली
19
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
20
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका

भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ही अट शाहबाज सरकारला पूर्ण करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 10:28 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची इच्छा कोणाला नाही? जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर भारत त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हणाले, काही लोक पाकिस्तानसोबत चर्चेबाबत बोलतात. जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर भारत त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा

बनिहाल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची इच्छा कोणाला नसेल? कारण मला वास्तव माहीत आहे की तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही.

राजनाथसिंह म्हणाले की, आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, पण आधी त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. जेव्हा पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पुरस्कृत करणे थांबवेल तेव्हा भारत त्यांच्याशी चर्चा सुरू करेल, असंही सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्री जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्यांपैकी ८५ टक्के मुस्लिम आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य होत्या. दहशतवादी घटनांमध्ये हिंदू मारले जात होते का? मी गृहमंत्री झालो आहे आणि मला माहीत आहे की, दहशतवादी घटनांमध्ये मुस्लिमांनी सर्वाधिक जीव गमावला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा