शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

अमेरिका, चीन, ब्रिटनची मोठी घोषणा; भारताच्या अडचणीत वाढ; काय करणार मोदी सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:54 PM

बड्या देशांनी डेडलाईन ठरवली; भारताकडून अद्याप कोणतीही घोषणा नाही

चीन, अमेरिका यांच्यानंतर जगात सर्वाधिक हरित गृह वायू उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक लागतो. मात्र आता भारतासमोरील अडचणी वाढणार आहेत. अमेरिका, चीन, सौदी अरेबिया आणि ब्रिटनसह अनेक मोठ्या देशांनी हरित गृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करून शून्य कार्बन उत्सर्जनचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. त्यासाठीची डेडलाईनदेखील या देशांनी निश्चित केली आहे. त्यामुळे आता भारतावर दबाव वाढला आहे. हरित गृह वायूंच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी ठाम भूमिका घेऊन डेडलाईन निश्चित करण्याचा आग्रह बड्या देशांनी धरला आहे.

जगभरात सध्या नेट झीरो एमिशनची जोरदार चर्चा आहे. यानुसार सर्व देशांना पर्यावरणात तितकेच हरित गृह वायू सोडता येतील, जितके ते जंगलांचं प्रमाण वाढवून आणि अन्य मार्गांनी करू शकतील. हरित गृह वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीवरील तापमान सातत्यानं वाढत असून त्यामुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे पर्यावरणाच्या समस्या वाढल्या आहेत.

अमेरिका, चीन आणि सौदी अरेबियाकडून नेट झीरोची घोषणाअमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियननं नेट झीरोचं लक्ष्य गाठण्यासाठी २०५० ची डेडलाईन नक्की केली आहे. तर चीन आणि सौदी अरेबियानं २०६० ही डेडलाईन निश्चित केली आहे. भारतानं मात्र अद्याप तरी कोणतीही डेडलाईन ठरवलेली नाही. हवामानातील बदलांसंदर्भात याच आठवड्यापासून स्कॉटलंडची राजधानी ग्लास्गोमध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP26) सुरू होणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून सरू होणारी परिषद १३ दिवस चालेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील.

केंद्रीय पर्यावरणमंत्री काय म्हणाले?नेट झीरो टार्गेटची घोषणा करून हवामान बदलाची समस्या सुटणार नाही, अशी भूमिका पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी काल मांडली. नेट झीरो कार्बन उत्सर्जनाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्बनमध्ये किती वाढ झालीय, याचा विचार व्हायला हवा, असं यादव म्हणाले. या दशकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेनं वातावरणात ९९ गीगाटन कार्बन सोडलेला असेल. युरोपियन युनियनच्या बाबतीत हेच प्रमाण ६६ गीगाटन असेल. २०६० पर्यंत चीननं वातावरणात ४५० गीगाटन कार्बनचं उत्सर्जन केलेलं असेल, अशी आकडेवारी त्यांनी मांडली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी