शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

भारत 39 पाकिस्तानी कैद्यांची करणार सुटका

By admin | Published: February 28, 2017 12:05 PM

सर्जिकल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताकडून मिळणा-या शांती प्रस्तावावर भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतातील 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - सर्जिकल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताकडून मिळणा-या शांती प्रस्तावावर भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतीय कारागृहांमधील 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील 21 कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली असून अन्य 18 जण मासेमारीचा व्यवसाय करणारे आहेत. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्यांच्या कैदेत असलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताकडे सुपूर्द केले होते. याबदल्यात 'भारताकडून पाकिस्तानी कैद्यांची सुटका केली जाईल', अशी अपेक्षा भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केली होती.
 
यासंदर्भात वरिष्ठ अधिका-याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आम्ही पाकिस्तानी कैद्यांची ओळख पटवण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारला माहिती दिली होती. त्यांनीही हे कैदी पाकिस्तानी असल्याची पुष्टी दिली आहे. या कैद्यांची 1 मार्चपर्यंत सुटका होईल'.
जमात-उत-दावा या संघटनेचे प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर भारताने आपली सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
 
दरम्यान पाकिस्तानसोबत पुन्हा संवाद प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे, असे केंद्र सरकारला वाटत असले तरी सध्या दोन्ही देशांमधील बोलणी पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी समूहांविरोधात कठोरातील कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत बातचित होणं अशक्य आहे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगत आपली भूमिका कायम ठेवली आहे.