शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 08:59 IST

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

Minister Nitin Gadkari: रोजगाराची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. विविध राजकीय पक्ष बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होताना दिसत नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगारासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. भारताला विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि सामाजिक-आर्थिक मॉडेलची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत रोजगाराच्या संधीबाबत भाष्य केले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे आणि असमानता कमी करणारे सामाजिक-आर्थिक मॉडेल आवश्यक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. एका मराठी पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

"चीनमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि कोरोनानंतर अनेक देश त्यांच्याशी व्यवसाय करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेजारीली देश मंदीसदृश परिस्थितीतून जात असून तिथे अनेक कंपन्या तेथे बंद पडत आहेत. पण आपण चीनकडून एक गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे समाजवादी, साम्यवादी किंवा भांडवलशाही बनण्याआधी, आपण अशी अर्थव्यवस्था बनली पाहिजे जी रोजगार निर्माण करू शकेल, गरिबी दूर करू शकेल आणि समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करू शकेल," असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष असताना चिनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीची आठवण नितीन गडकरींनी सांगितली. "चिनी राष्ट्रपतींनी मला सांगितले होते की चिनी लोक त्यांच्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विचारधारेची पर्वा न करता काहीही करण्यास तयार आहेत," असेही नितीन गडकरी म्हणाले.

"गरिबी दूर करण्यासाठी, भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणण्याची गरज आहे. आपल्याला कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येतील लोक गरीब राहिल्यास, रोजगाराशिवाय त्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेच नाही तर आत्मनिर्भर भारत निर्माण होऊ शकत नाही," असेही गडकरींनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीUnemploymentबेरोजगारीchinaचीन