शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 8:51 AM

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

Minister Nitin Gadkari: रोजगाराची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. विविध राजकीय पक्ष बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होताना दिसत नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगारासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. भारताला विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि सामाजिक-आर्थिक मॉडेलची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत रोजगाराच्या संधीबाबत भाष्य केले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे आणि असमानता कमी करणारे सामाजिक-आर्थिक मॉडेल आवश्यक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. एका मराठी पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

"चीनमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि कोरोनानंतर अनेक देश त्यांच्याशी व्यवसाय करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेजारीली देश मंदीसदृश परिस्थितीतून जात असून तिथे अनेक कंपन्या तेथे बंद पडत आहेत. पण आपण चीनकडून एक गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे समाजवादी, साम्यवादी किंवा भांडवलशाही बनण्याआधी, आपण अशी अर्थव्यवस्था बनली पाहिजे जी रोजगार निर्माण करू शकेल, गरिबी दूर करू शकेल आणि समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करू शकेल," असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष असताना चिनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीची आठवण नितीन गडकरींनी सांगितली. "चिनी राष्ट्रपतींनी मला सांगितले होते की चिनी लोक त्यांच्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विचारधारेची पर्वा न करता काहीही करण्यास तयार आहेत," असेही नितीन गडकरी म्हणाले.

"गरिबी दूर करण्यासाठी, भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणण्याची गरज आहे. आपल्याला कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येतील लोक गरीब राहिल्यास, रोजगाराशिवाय त्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेच नाही तर आत्मनिर्भर भारत निर्माण होऊ शकत नाही," असेही गडकरींनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीUnemploymentबेरोजगारीchinaचीन