शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 7:39 AM

देशात ६८ टक्के यूझर्स ठरले विविध गुन्ह्यांचे बळी

महेश घाेराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटाबंदी तसेच कोविडनंतर देशात ऑनलाइन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोबाइल इंटरनेटचा वापर चैनीबरोबरच सोयीचाही झाला. मात्र दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे सायब्रर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात ६८% यूझर्सनी डिसेंबर २०२२ पर्यंत कोणत्या ना कोणत्या सायबर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. अमेरिका अशा घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ४९% लोकांना सायबर क्राइमचा वाईट अनुभव आहे.

महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

- सायबर विश्वातून होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टाॅकिंगमध्ये महाराष्ट्र २०२१ मध्ये देशात आघाडीवर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली होती. - अजूनही महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायलर, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँकिंगशी संबंधित गुन्हे आदीचे प्रमाण चिंताजनक आहे. - वाढते कॅशलेश व्यवहार, कोविडनंतर ऑनलाइन सेवांमध्ये झालेली वाढ याबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.

देशनिहाय यूझर्सचे प्रमाण

  • ६८% - भारत
  • ४९% - अमेरिका
  • ४०% - ऑस्ट्रेलिया 
  • ३८% - न्यूझीलंड
  • ३३% - इंग्लंड
  • ३३% - फ्रान्स
  • ३०% - जर्मनी 
  • २१% - जपान

(स्त्रोत : स्टॅटिस्टा रिपोर्ट, डिसेंबर २०२२ पर्यंतची स्थिती)

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतAmericaअमेरिकाMaharashtraमहाराष्ट्र