शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारत १ लाख लोकांना तैवानला पाठवणार; मोदी सरकारच्या या निर्णयानं चीनला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 20:03 IST

चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे.

नवी दिल्ली - तैवान भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी भेट देत आहे. यामुळे चीनला मिर्ची झोंबणार आहे. तैवान भारतातील एक लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार आहे. हा करार झाल्यास भारत आणि तैवानमधील आर्थिक संबंध आणखी घट्ट होऊ शकतात. दुसरीकडे, तैवानचा शेजारी देश चीनला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तैवान १,००,००० हून अधिक भारतीयांना कारखाने, शेतात आणि रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी नियुक्त करू शकते. डिसेंबरच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी नोकरीच्या करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते असं अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

तैवानला मनुष्यबळाची आवश्यकता

तैवानचे लोक सतत वृद्ध होत आहेत. त्यासाठी त्यांना अधिकाधिक लोकांची गरज आहे. दुसरीकडे, भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगवान असली तरी श्रमिक बाजारात दरवर्षी लाखो नोकऱ्या निर्माण करणे पुरेसे नाही. २०२५ पर्यंत तैवान एक "सुपर एज्ड" समाज होईल, ज्यात वृद्ध लोक लोकसंख्येच्या पाचपटीपेक्षा अधिक असतील असा अंदाज आहे. भारत-तैवान जॉब डीलमुळे चीनचं टेंशन वाढणार आहे. चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे.

चर्चा अंतिम टप्प्यात

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत-तैवान जॉब डील आता शेवटच्या टप्प्यावर आहे. ब्लूमबर्गने संपर्क साधला असता तैवानच्या कामगार मंत्रालयाने भारताच्या करारावर विशेष भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले की, जे कामगार देऊ शकतील अशा देशांच्या सहकार्याचे स्वागत करतो. तैवानला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय कामगारांचे आरोग्य प्रमाणित करण्यासाठी अद्याप एक यंत्रणा काम करत आहे अशी तज्ज्ञांनी माहिती दिली.

या देशांमध्येही नोकरीसाठी करार

तैवानमध्ये जिथे बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आला आहे, सरकारला त्याची ७९० डॉलर अब्ज अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी कामगारांची आवश्यकता आहे. हा करार अधिक चांगला करण्यासाठी तैवान भारतीय कामगारांना पगार आणि विमा पॉलिसी स्थानिकांच्या बरोबरीने देत आहे. भारत सरकार सध्या वृद्धत्वाचा सामना करत असलेल्या विकसित देशांसोबत नोकरीच्या करारासाठी जोर देत आहे. यावर्षी भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. तज्ञांच्या मते, भारत सरकारने आतापर्यंत जपान, फ्रान्स आणि यूकेसह १३ देशांशी करार केले आहेत. नेदरलँड, ग्रीस, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्याशीही अशीच व्यवस्था करण्याबाबत चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन