शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

भारतातच स्वातंत्र्य हवे आहे!

By admin | Published: March 04, 2016 3:44 AM

भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी

नवी दिल्ली : भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरात बोलताना त्याने सरकारला लक्ष्य केले. कन्हैया म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझे मतभेद आहेत पण, त्यांनी स्मृती इराणींच्या जेएनयू प्रकरणावरील भाषणानंतर सत्यमेव जयते असे जे व्टिट केले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. कारण, हे संविधानातील शब्द आहेत. भारतातील संविधान आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही तो म्हणाला. आम्ही अभाविपला शत्रू समजत नाही, कारण आमचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे. आम्ही अभाविपला विरोधी पक्षासारखेच पाहतो. माझी अटक म्हणजे एक सुनियोजित कट असल्याचेही तो म्हणाला. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. यावेळी त्याने सरकारवर चौफेर टोलेबाजी केली, तो म्हणाला, मोदीजी मन की बात करतात, पण दुसऱ्यांचे ऐकत नाहीत. जेएनयूविरोधात जीही सत्ता उभी राहिली त्याला आम्ही धडा शिकवला आहे, असे सांगून तो म्हणाला की, लढणारे जबादार नाहीत लढवणारे जबाबदार आहेत. देशातील सरकार हे लोकविरोधी सरकार आहे. आम्हाला भ्रष्टाचारपासून स्वातंत्र्य हवंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे? असा सवालही त्याने केला.