शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

भारत पहिली गोळी चालवणार नाही

By admin | Published: September 12, 2015 2:57 AM

आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

नवी दिल्ली : आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सीमा प्रश्नांवर चर्चेसाठी आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला दिली.यावर पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुख बुर्की यांनी मात्र आपल्या देशाच्या वतीने कुठलीही वचनबद्धता जाहीर करण्यास असमर्थता दर्शविली. गृहमंत्र्यांप्रमाणे मी नेतृत्वाचा हिस्सा नसून केवळ एका दलाचा महासंचालक आहे. त्यामुळे सिंग यांचा हा संदेश मी आमच्या देशाच्या नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचता करेन, असे ते म्हणाले.बुर्की यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ सीमा प्रश्नावर चर्चेकरिता तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहे. पाकिस्तानच्या बाजूने भारतात कुठल्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही सिंग यांनी केली. भारत व पाकिस्तानने दहशतवादाच्या धोक्याचा एकजुटीने सामना केला पाहिजे, असे मत व्यक्त करताना ते म्हणाले की, दोन्ही देश दहशतवादाने पीडित असून पाकिस्तानसोबत विविध स्तरावर चर्चा करण्याची भारताची मनीषा आहे. त्या अनुषंगानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे रशियाच्या उफा येथे पाकिस्तानातील त्यांचे समकक्ष नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा होऊ शकली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)