शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

Indian Air Strike on Pakistan: मसूद अजहरचा मोठा भाऊ ठार; भारतानं जैशचं कंबरडं मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 3:38 PM

नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हवाई दलानं केलेली कारवाई यशस्वी

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली आहे. भारतीय हवाई दलानं केलेल्या या कारवाईनं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचा या कारवाईत खात्मा झाला आहे. याशिवाय मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत मारला गेला. भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले आहेत. बालाकोटमध्ये करण्यात आलेला हल्ला सर्वाधिक यशस्वी ठरला. बालाकोट जैशचा सुरक्षित आणि सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जातो. बालाकोटवर हवाई दलानं अचूक निशाणा साधला. यात मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर ठार झाला. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात आलं होतं. यातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला मौलाना मसहूद अजहरला सोडून द्यावं लागतं होतं.  इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात इब्राहिम अजहरची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनं जैशला मोठा धक्का दिला आहे. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत ठार झाला आहे. याशिवाय ऑपरेशन हेड मुफ्ती अजहरदेखील भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मारला गेला. बालाकोट नियंत्रण रेषेपासून जवळपास 40 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे या भागात हल्ला होईल, याची कल्पना जैशनं केली नव्हती. 2016 मध्ये उरीचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यामुळे यावेळी पुलवामातील हल्ल्यानंतर पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचे तळ तातडीनं हलवले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलानं थेट सीमा ओलांडून 40 किलोमीटरपर्यंत जाऊन बॉम्बफेक केली आणि जैशला धडा शिकवला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद