शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 13:49 IST

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

ठळक मुद्देचीनसोबतच्या तणावामुळे भारताचा मोठा निर्णयभारतीय लष्कराला आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार५० हजार कोटींचा शस्त्रसाठा विकत घेणार भारतीय लष्कर

नवी दिल्लीचीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने महत्वाचं पाऊल उचललं आहे. भारतीय सुरक्षा दलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा युद्धसाठा करुन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नव्या अधिकारांमुळे आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करुन येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्कर तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. 

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

परकीय शक्तींकडून देशावर हल्ला झाल्यास १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा तयार ठेवण्याची परवानगी सुरक्षा दलांना होती. त्यात वाढ करुन आता १५ दिवसांचा शस्त्रसाठा सुरक्षा दलाला ठेवता येणार आहे. "शत्रू देशासोबत लढाईचा प्रसंग उद्भवल्यास १५ दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक तो शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे", अशी माहिती सरकारी सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. 

चीन आणि पाकिस्तानला एकत्रितरित्या सामोरं जाण्यासाठी भारताची तयारीभारत सध्या चीनच्या सीमेवरील कुरापतींचा सामना करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सुरू असलेली घुसखोरीही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख बिपिन रावत यांनीही याआधी अनेकदा चीन आणि पाकिस्तानसोबत एकत्रितरित्या तोंड द्यावं लागण्याची तयारी करायला हवी असं म्हटलं आहे. चीनसोबतच्या तणावामुळे भारताने अनेक सुरक्षा करार केले आहेत. याशिवाय अनेक स्वदेशी मिसाइलची चाचणी केली जात आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान