शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 4:35 PM

शेतकऱ्यांची आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानात टंचाई

भोपाळ: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दहापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. देशवासीयांचा आक्रोश जराही कमी झालेला नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी कायम आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधले शेतकरीदेखील मागे नाहीत. छतरपूरमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात नागवेलीच्या पानांची निर्यात होते. मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी पानांचा पुरवठा रोखला आहे. पाकिस्तानला पानं पाठवणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात पानांची टंचाई जाणवू लागली आहे.व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. छतरपूर जिल्ह्यातील गढिमलहरा, महाराजपूर, पिपट, पनागर आणि महोबामध्ये मोठ्या प्रमाणात नागवेलीचं (पानवेल) उत्पादन होतं. या भागातून देशाच्या अनेक शहरांमध्ये पानांचा पुरवठा केला जातो. याशिवाय पाकिस्तान, श्रीलंकेतखील पानांची निर्यात होते. मात्र सध्या पाकिस्तानात होणारी निर्यात शेतकऱ्यांनी थांबवली आहे. पुलवामा हल्ल्यामुळे शेतकरी अतिशय संतप्त आहेत. 'दहशतवाद्यांमुळे आमच्या जवानांचं रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला पानांची निर्यात करणार नाही. यामुळे आम्हाला नुकसान सोसावं लागलं तरी चालेल,' असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. छतरपूरमधील पानं मेरठ आणि शहारंगपूरहून पाकिस्तानला निर्याम केला जातात. आठवड्यातून तीन दिवस पानाची 45 ते 50 बंडलं पाकिस्तानला पाठवली जातात. एका बंडलची किंमत 30 हजार रुपये असते. पाकिस्तानला पानं न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं 13 ते 15 लाखांचं नुकसान होत आहे. मात्र आम्हाला फायदा-तोट्याची चिंता नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. भारत सरकार पानी रोखण्यासारखा मोठा निर्णय घेऊ शकतं. तर आम्ही देशासाठी, जवानांसाठी इतकं नक्कीच करु शकतो, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाFarmerशेतकरीPakistanपाकिस्तान