शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 5:41 PM

दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे...

भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार कंबरकसून काम करत आहे. 2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी माहिती -  गडकरी म्हणाले, सरकारने महामार्गांवरील ब्‍लॅक स्‍पॉट्स संपवण्यासाठी आता पर्यंत 25 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे आणि 2024 च्या अखेरपर्यंत आपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. 

खर्च करण्यात आले 25 हजार कोटी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2024 पर्यंत रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी सरकार महामार्गांवरील  ब्‍लॅक-स्‍पॉट हटविण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या अशा भागाला ब्लॅक-स्पॉट म्हटले जाते, जेथे 3 वर्षांत पाच रस्ते अपघात झालेले असतील, अथवा, याच काळात 10 मृत्यू झालेले असतील. गडकरी म्हणाले, ब्लॅक-स्पॉट हटविण्यासाठी सरकारने आतापर्यंत 25,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने सरकार 15,000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांवर काम करत आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात