शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, 80 नाही 90 नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
2
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
3
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
4
Arjun Tendulkar Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत केला कहर; संघाला मिळवून दिला विजय
5
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
6
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
7
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
8
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
9
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
10
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
11
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
12
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
13
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
15
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
16
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
17
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
18
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
19
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
20
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 7:58 AM

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; तत्काळ अंमलबजावणी सुरू

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठीचे नियम बदलत असतात. तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं गरजेचं असतं. रेल्वेकडून तयार करण्यात आलेलं नियम रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होतील. रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेकांना त्यांच्या सहप्रवाशांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी रेल्वेला मिळतात. त्यामुळे रेल्वेनं नियमांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांना रात्री कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यास रेल्वे अशा व्यक्तींविरोधात कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियमाच्या अंतर्गत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन समस्या सोडवावी लागेल. तक्रारीचं निराकरण न झाल्यास त्यासाठी कर्मचारी उत्तरदायी असेल. रेल्वे मंत्रालयानं सगळ्यांना विभागांना याबद्दलचे आदेश दिले असून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत. 

शेजारच्या आसनांवरील प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असल्याच्या, गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वेला मिळतात. काही एकत्र प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असतात. रात्री लाईट सुरू ठेवण्यावरूनही रेल्वे प्रवाशांमध्ये वाद झाले आहेत. 

रात्री १० नंतर खालील नियम लागू- कोणताही प्रवास मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गाणी ऐकू शकणार नाही.- रात्री नाईट लाईट सोडून सगळे दिवे बंद करावे लागणार.- ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. सहप्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई होणार.- चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग स्टाफसोबत शांतपणे बोला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे