शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Indian Railway: तिकीट असतानाही प्लॅटफॉर्मवर भरावा लागू शकतो दंड, जाणून घ्या रेल्वेचा हा नियम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:54 IST

Indian Railway, Train Ticket Rule: भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हे प्रवासासाठीचे सुरक्षित आणि स्वस्त साधन मानले जाते.

भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हे प्रवासासाठीचे सुरक्षित आणि स्वस्त साधन मानले जाते. मात्र ट्रेनमधून प्रवास करण्यासाठीचे विविध प्रकारचे नियम बनवण्यात आलेले आहेत. त्याच प्रकारे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहण्याबाबतही एक खास नियम आहे. त्या नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या नियमाबाबत रेल्वेने प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना माहिती नाही आहे. हा नियम काय आहे, ते जाणून घेऊया.

ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोक नेहमी वेळेआधी रेल्वे स्टेशनवर पोहोचतात. मात्र तिकीट घेतल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. तसेच या नियमाचं पालन केलं नाही तर दंड भरावा लागू शकतो. हा नियम काय आहे, ते जाणून घेऊयात.

ट्रेनचं तिकीट घेतल्यानंतर जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलात.  तर तिथे थांबण्यासाठी खास नियम आहे. जर तुमची ट्रेन दिवसाची असेल तर तुम्ही ट्रेनच्या निर्धारित वेळेआधी दोन तास रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकता. तसेच जर ट्रेन रात्रीची असेल तर तुम्ही ट्रेनच्या वेळेआधी सहा तास स्टेशनवर येऊ शकता. या वेळेत आल्यास तुम्हाला कुठलाही दंड भरावा लागणार नाही. तसेच ट्रेनमधून उतरल्यानंतरी हाच नियम लागू होतो. तु्म्ही ट्रेनमधून उतरल्यावर दोन तास रेल्वे स्टेशनवर थांबू शकता. तर रात्रीच्या वेळी ट्रेनमधून उतरल्यावर तुम्ही सहा तास स्टेशनवर थांबू शकता. त्यासाठी तुम्हाला तिकीट जवळ बाळगावं लागेल. तसेच ते टीटीईने मागितल्यास दाखवावं लागेल.

जर तुम्ही निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ रेल्वे स्टेशनवर थांबला तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळी २ तास आणि रात्री ट्रेनच्या निर्धारित ६ तास वेळेपेक्षा अधिक वेळ स्टेशनवर थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागेल. असं न केल्यास टीटीई तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधताही केवळ २ तास असते, त्यापेक्षा अधिक काळ थांबल्यास तुमच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी