शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 1:20 PM

Indian Railway Privatization: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारभारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. ही शंका जुनी झाली आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, असे सांगतं अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.

न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या खासगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही शंका आता जुनी झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं सांगितलं होतं. रेल्वे एवढी कॉम्प्लेक्स आहे. सोशल ऑब्लिगेशन आहे, सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यामुळे तिच्या खासगीकरणाचा कुठलाही इरादा नाही आहे. स्पष्टपणे सांगायचं तर रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकपणा आणला आहे. २११ शहरांमधील ७२६ सेंटरमध्ये १५ भाषांमध्ये १.२५ कोटी परीक्षार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षेचं आयोजन करणं सोपं नाही. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा नेतृत्व देशाला कुठल्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित आहे हे स्पष्ट असतं. एवढ्या  मोठ्या प्रमाणात रोजगार देण ही मोठी गोष्ट आहे.

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, रेल्वे एक टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिसिजन खूप मौल्यवान असतं. मात्र सर्वांची आपलं काम करण्याची एक पद्धत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करतात. पहाटे ४ वाजता जपानहून पोहोचून कॅबिनेट मिटिंगमध्ये उपस्थित राहतात. ते मेहनत आणि पराकाष्ठेचं ज्वलंत उदाहरण समोर ठेवतात. आपल्या देशातील वर्क कल्चरमध्ये परिवर्तन आलं आहे. पारदर्शकता वाढली आहे. नेतृत्व स्पष्ट असलं तर सर्व टीमना काम करणं सोपं पडतं. तसेच ती स्पष्टता पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत.

भारत गौरव ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्यापक विचार आहे. तुम्ही जेव्हा कुठल्याही देशात जाता तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा हेतू प्रभावी पद्धतीने आपली संस्कृती दाखवण्याचा असतो. भारतामध्ये लाखो गोष्टी आहेत. रेल्वेने त्यांचंच माध्यम बनवलं पाहिज, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार