शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 18:11 IST

Indian Railways: दक्षिण रेल्वे समुद्रामार्गे जाणारा एक आधुनिक पूल बांधणार आहे. यामुळे रामेश्वर ते धनुषकोडी अंतर आणखी जवळ होईल.

Indian Railways: भारतीय रेल्वे वेळोवेळी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक बदल करत आहे. देशात रेल्वेने अनेक भव्य पूल बांधले आहेत, ज्यांची जगभरात वेगळी ओळख आहे. असाच एक पूल दक्षिण रेल्वे बांधत आहे. हा पूल पाण्याचे जहाज जवळ आल्यावर पाण्यावरुन वर येईल. रामेश्वरमला जाणारे भाविक येत्या काळात या अभियांत्रिकी आश्चर्याचे साक्षीदार होतील. सुमारे 560 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पंबन पुलावर लिफ्ट सिस्टिम वापरून ट्रॅक टाकण्यात येणार असून, त्यावरून ताशी 80 किमी वेगाने ट्रेन धावणार आहे.

धनुषकोडीसाठी पुन्हा रेल्वे मार्ग सुरू होईलरामेश्वरम आणि धनुषकोडी यांना पुन्हा एकदा रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. यातून रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. या पुलाच्या निर्मितीमुळे रेल्वेला रामेश्वरमपर्यंत अनेक नवीन गाड्या चालवता येणार आहेत.

समुद्री वादळात रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला होताधनुषकोडीमध्ये पूर्वी एक रेल्वे स्टेशन होते, तेथून पुढे श्रीलंकेला माल जात असे. पण साठच्या दशकात आलेल्या भीषण सागरी वादळात हे रेल्वे स्थानक आणि रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला. तेव्हापासून ते बनवण्यात कोणीही रस दाखवला नाही. साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही रेल्वे लाईन सुरू होणार आहे. या स्थानकाला पर्यटन आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

18 किमी रेल्वे मार्गमदुराई विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आनंद यांच्या मते, रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करून ते नवीन ब्रॉडगेज आणि इलेक्ट्रिक लाईन्सने जोडण्याची योजना आखत आहे. ही रामेश्वरमपासून 18 किमीची लाईन असेल आणि तिला 3 थांबे असतील. यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या असलेला पूल 120 वर्षे जुना असल्याने सध्या या पुलावरून केवळ डझनभर गाड्या जातात. त्याचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका आहे. एवढेच नाही तर जुन्या पंबन पुलावरून मालगाड्याही धावत नाहीत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने पंबन पुलासह नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

लिफ्ट सिस्टम वापरुन पुलाची पुनर्बांधणी केली जाणारसमुद्रातून जहाज आल्यावर पूल आपोआप वर जाईल यासाठी लिफ्ट सिस्टिम वापरून पंबन पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. या आधी बांधलेल्या पुलांना स्वतंत्र ट्रॅक असायचे. जहाज आल्यानंतर ट्रॅक वर जायचे आणि जहाज गेल्यावर पुन्हा एकमेकांशी जोडायचे. याला सुमारे अर्धा तास लागत असे. पण, आता पंबन पुलातील लिफ्ट सिस्टिमचा वापर केल्यानंतर जहाज आल्यानंतर ट्रॅक लिफ्टप्रमाणे वर जातील आणि जहाज सुटल्यानंतर जागेवर परत येतील. या प्रक्रियेस फक्त 10 मिनिटे लागतील. विशेष म्हणजे, जुना पंबन पूल समुद्राच्या मध्यभागी बांधला गेला आहे.

धनुषकोडीला पोहोचणे सोपे होईलरेल्वेच्या म्हणण्यानुसार, धनुषकोडी ते रामेश्वरमपर्यंत 18 किमी, सिंगल लाइन रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे. यामुळे रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. राम-सेतू रामेश्वरमपासून सुरू होतो. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राजवळ बांधले जाणारे हे रेल्वे स्थानक खास असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 700 कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाणार असून, 18 किमीपैकी 13 किमीचा रेल्वे ट्रॅक एलिव्हेटेड असेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRameshwar mandir Achraरामेश्वर मंदिर आचऱाTamilnaduतामिळनाडू