शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:56 AM

जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

भारतात २०२१ मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

तारखा पुढे ढकलल्या...

नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते. 

जनगणना याआधी कधी झाली नाही?

भारतात जनगणनेच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली आहे. १९४१ दुसऱ्या महायुद्धामुळे जनगणनेला उशिर झाला असला तरी सर्वेक्षणाचे काम वेळेवर पूर्ण करून माहितीचे संकलन केले होते. १९६१भारत-चीन युद्ध वेळीही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. १९७१ बांगलादेश निर्मिती वेळी पाकिस्तान सोबत युद्ध झाले. पण याही वर्षी जनगणना नीटपणे पूर्ण करण्यात आली.

जनगणना का गरजेची? 

पहिली जनगणना १८८१ साली झाली. नंतर दर १०-१० वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर १० वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. २०२१ मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा यात खंड पडणार आहे.याआधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.

इतर देशांमध्ये जनगणनेचे काय झाले? 

मेरिकेत कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही २०२० मध्ये जनगणना करण्यात आली.इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमध्ये ही कोरोना महामारी सुरु असताना विविध यंत्रणांनी ठरलेल्या वेळी माहिती जमवण्याचे काम सुरु केले.ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला तिथेही जनगणना ठरलेल्या वेळी पार पडली.

टॅग्स :Indiaभारत