शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:46 IST

भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे.

India on Terrorism : दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आणि भारतीय भूमीवर कब्जा करणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. या अंतर्गत गुरुवारी(29 ऑगस्ट) अरिहंत वर्गाची दुसरी आण्विक पाणबुडी, INS अरिघाट विशाखापट्टणम येथील नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. दरम्यान, आता यावरुन पाकिस्तान आणि चीनचे सुरक्षा तज्ज्ञ भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे कौतुक करत आहेत.

पाकिस्तानने संरक्षण मंत्री काय म्हणाले?भारताच्या वाढत्या आण्विक सामर्थ्यावर पाकिस्तानी संरक्षण तज्ञ कमर चीमा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही ठिकाणांहून भारत अण्वस्त्र हल्ले करू शकतो. आपली सुरक्षा लक्षात घेऊन भारत तिन्ही सैन्यात मोठी गुंतवणूक करत आहे. भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत. भारताने हा संदेशही दिला आहे की, पीएम मोदी फक्त एकच आण्विक पाणबुडी घेऊन येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया कमर चीमाने दिली.

कशी आहे पाणबुडीअरिहंत वर्गाची दुसरी पाणबुडी अरिघाटाची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे आणि ही अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली आणि उपकरणांनी सुसज्ज आहे. याची लांबी 112 मीटर, रुंदी 11 मीटर आणि वजन सुमारे 6 हजार टन आहे. ही घातक K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून, याची मारक क्षमता 750 किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, यातून आपल्या देशाला कोणताही धोका नसल्याचा दावाही पाकिस्तानी तज्ज्ञांनी केला आहे.

भारताच्या सामर्थ्याला चीनही घाबरलाचीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही आयएनएस अरिघाटबद्दल एक लेख लिहिला आहे. या लेखाच्या मथळ्यात भारताने या आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडीचा जबाबदारीने वापर करायला हवा, असे लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखात लिहिले की, अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्यांमुळे भारताची अणुशक्ती वाढली आहे. याचा उपयोग शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी केला पाहिजे, ताकद दाखवण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी नाही.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान