शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था विश्वासार्ह अन् सुरक्षेची प्रक्रियाही उच्च प्रकारची- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:04 AM

क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले. 

नवी दिल्ली : भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था ही खूप विश्वासार्ह आणि सुरक्षेची प्रक्रियाही अतिशय उच्च प्रकारची असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले. क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले. क्षेपणास्त्र हाताळण्याची प्रमाणित आणि त्याची देखभाल करण्याच्या पद्धतीचा आढावा घेतला जात  असून, काही दोष आढळल्यास ते तत्काळ दूर केले जातील, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. 

भारताची भूमिका अपूर्ण - कुरेशी

भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागले गेल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत मांडलेली भूमिका ही ‘अपूर्ण’ आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताचे म्हणणे फेटाळले. त्या घटनेच्या संयुक्त चौकशीची मागणी कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा केली. मंत्री सिंह यांनी लोकसभेत जे सांगितले ते पाकिस्तानचे समाधान करणारे नाही, असे ते म्हणाले. क्षेपणास्त्र डागले जाणे हे कमालीचे बेजबाबदारपणाचे आहे.

अन्य कारण सूचित होत नाही - अमेरिका

भारतातून ९ मार्च रोजी पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र हे अपघाताशिवाय अन्य कोणत्याही कारणांनी होते असे सूचित होत नाही, असे अमेरिकेने म्हटले. भारताने शुक्रवारी म्हटले की, “भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात अपघाताने पडले आणि त्याबद्दल तीव्र खेद होतोय. ती घटना तांत्रिक दोषामुळे घडली.” अपघाताशिवाय दुसऱ्या काेणत्याही कारणाने तो प्रकार घडलेला नाही हे भारतानेही म्हटले आहे. आमच्याकडे त्याशिवाय दुसरे काही सूचित करणारे नाही. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तान