शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

Coronavirus: ७ मेनंतर भारतात पहिल्यांदाच घडलं, ‘R’ रेटनं टेन्शन वाढलं; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 8:56 AM

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल.

ठळक मुद्देभारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झालाR वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावीजर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर

नवी दिल्ली – भारतात ७ मे नंतर पहिल्यांदाच कोरोना व्हायरस(SARS COV 2) ची R वॅल्यू १ च्या पलीकडे गेली आहे. याबाबत माहिती इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स चेन्नईच्या स्टडीतून समोर आली आहे. R0 अथवा R हा असा फॅक्टर आहे जो कोरोना संक्रमित एक व्यक्तीपासून किती लोकांना संक्रमण पोहचवू शकतो याचा अंदाज देतो. देशात काही राज्यांना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स कम्प्यूटेशनल विज्ञान आणि थियोरेटिकल फिजिक्सचे प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, २७ जुलैनंतर भारतात ‘R’ १ पार केले आहे. ७ मेनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपुष्टात आली होती. २७ ते ३१ जुलैमध्ये R वॅल्यू १.०३ इतकी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या भारतात R वॅल्यू १ च्या आसपास पोहचल्याची माहिती दिली आहे.

१ च्या खाली मूल्यांकन चांगले

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल. कारण ही महामारी कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकत नाही. R वॅल्यूचा अर्थ एक कोरोना संक्रमित व्यक्ती सरासरी कमीत कमी एक व्यक्ती संक्रमित करू शकतो. तर १ पेक्षा कमी वॅल्यूचा अर्थ कोरोना संक्रमित व्यक्ती एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतो.

याराज्यात R वॅल्यू चिंतेचा विषय

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा वगळता बहुतांश पूर्वोत्तर राज्यात R वॅल्यू १ पेक्षा अधिक आहे. विशेषत: केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश याठिकाणी वाढणाऱ्या सक्रीय रुग्णांमुळे डोकेदुखी वाढली आहे. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात R वॅल्यू १ च्या आसपास आहे.

तिसऱ्या लाटेची संभावना असताना धोका वाढला?

भारतात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता R वॅल्यूमुळे धोका वाढला का यावर प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, R वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावी. जर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धोक्याचे संकेत आहेत असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत