शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाच पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Published: June 01, 2017 4:33 PM

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमबेर आणि बट्टल सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, तर सहा ते सात सैनिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या कारवाईनंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त जे पी सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे. 
 
राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रणं रेषेवर असणा-या चौक्यांवर पाकिस्तानने गुरुवारी मोर्टारने हल्ला करत, गोळीबारी करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. हल्ल्यात जनरल इंजिनिअरिंग रिझर्व्ह फोर्सचा एक कर्मचारी मारला गेला, तर दोघेजण जखमी झाले होते. जखमींमध्ये बीएसएफचा एक जवानही सामील होता. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. 
 
लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंत कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी लष्कराने सकाळी साडे सात वाजता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर मोर्टारने हल्ला करत गोळीबारदेखील केला". पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील कृष्णाघाटी सेक्टरमध्येही गोळाबार केला असल्याचं त्यांनी सांगितलं. नियंत्रण रेषेवर बालनोई आणि मानकोट सेक्टरमध्येही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. 
 
यावर्षी मे महिन्यात पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या फायरिंगचा फटका 12 हजार लोकांना बसल्याचं कळत आहे. 17 मे रोजी पाकिस्तानी सैन्यांनी राजौरी जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर हल्ला केला होता. 15-16 मे रोजी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने सेनेच्या रहिवासी ठिकाणांवर तोफा डागल्या होत्या. तसंच 13 मे रोजी पाकिस्तानने रहिवासी परिसर आणि मुख्य चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते.